इस्लाममध्ये मोहर्रमचे महत्त्व -

इस्लाममध्ये मोहर्रमचे महत्त्व

0

मोहर्रम हा इस्लामी पंचांगातील प्रथम महिना असून तो अत्यंत पवित्र आणि धार्मिक महत्त्वाचा मानला जातो. इस्लाममधील चार पवित्र महिन्यांपैकी एक म्हणून त्याचा उल्लेख कुरआनमध्येही केला गेला आहे. मोहर्रम महिन्याला “अल्लाहचा महिना” (Shahrullah) असंही म्हटलं जातं.

मोहर्रमचे धार्मिक महत्त्व:

1. पवित्रता आणि संयमाचे प्रतीक:
या महिन्यात जास्तीत जास्त इबादत (उपासना), रोजे आणि सदाचार यावर भर दिला जातो.

2. आशुरा दिनाचे महत्त्व (१०वा मोहर्रम):
आशुराच्या दिवशी अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक घटना घडल्या:

  • हजरत मूसा (अ.स.) यांनी आपला फिरऔनपासून बचाव केला  होता.
  • हजरत नूह (अ.स.) यांचे जहाज जमीनीवर स्थिर झाले होते.
  • या दिवशी उपवास ठेवणे (रोजा) फार पुण्यकारक मानले जाते. पैगंबर मुहम्मद (स.अं.) यांनीही आशुराचा रोजा ठेवण्याची परंपरा पाडली होती.

3. करबला आणि इमाम हुसैन (र.अ.) यांचे बलिदान:
१० मोहर्रम म्हणजेच आशुराच्या दिवशी इमाम हुसैन (र.अ.) – पैगंबर मुहम्मद (स.अं.) यांचे नातू – यांनी करबलाच्या रणांगणात अन्यायाविरुद्ध लढा देताना शहिदी प्राप्त केली. त्यांनी आपल्या कुटुंबासह सत्य, इमान आणि धर्माच्या रक्षणासाठी प्राण दिले. म्हणून शिया मुसलमान या महिन्यात मातम करतात, तर सुन्नी मुसलमान उपवास, नमाज आणि कुरआन पठण यांत गुंतलेले असतात.
इमाम हुसैन (अ.स.) हे करबला युद्धात केवळ तलवारानेच नव्हे, तर आपल्या शब्दांनीसुद्धा सत्याचा संदेश देत होते. त्यांचे विचार, वचने आणि भाषणे आजही अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतात.


करबला युद्धापूर्वीचे इमाम हुसैन यांचे शब्द:
1. “मी माझ्या आजोबांचा (पैगंबर मोहम्मद स.अं.) धर्म वाचवण्यासाठी निघालो आहे.”
2. “मी इस्लाममध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी निघालो आहे. मी यजत (अन्याय) विरुद्ध आणि हक़ (सत्य) साठी उभा राहिलो आहे.”
3. “मरण ही एक निश्चित बाब आहे. परंतु इज्जतीने मरण हे गुलामीतील जीवनापेक्षा श्रेष्ठ आहे.”
4. “जर धर्म माझ्या मरणाशिवाय वाचू शकत नसेल, तर हे तलवारी, मला कवेत घेऊन पुढे या!”

करबला युद्धादरम्यान इमाम हुसैन यांचे शब्द:
1. “हे लोकांनो! तुम्ही मला का मारू इच्छिता? मी कोणाचा खून केला आहे? कोणती संपत्ती लुटली आहे?”
2. “हे लोकांनो! तुम्ही मला पाण्यापासून वंचित केले आहे. हेच पाणी तुम्ही जनावरांना देत आहात, पण पैगंबराचा नातू त्यापासून वंचित आहे!”
3. “मी तुम्हाला जागृत करण्यासाठी आलो आहे, अन्यायाच्या अंधारातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी.”
4. “शत्रू जरी हजारोंमध्ये असला, तरी मी एकटा नसतो. अल्लाह माझ्याबरोबर आहे.”

करबला युद्धाच्या शेवटच्या क्षणांतील इमाम हुसैन यांचे शब्द:
1. (अली अकबरच्या शहीदीनंतर) – “हे पुत्रा! तू गेलास पण तुझ्या बलिदानाने मी अधिक दृढ झालो.”
2. (अब्बास अ.स. यांच्या शहादतीनंतर) – “माझा खांदा तुटला… पण माझी उमेद नाही तुटली.”
3. (एकट्या उभा असताना) – “जर तुम्हाला आमच्यावर दया नसेल, तरी तरी तरी तुम्ही स्वतःच्या आत्म्याचा विचार करा. मी कोण आहे हे जाणून घ्या!”
4. (शेवटचा सजदा करताना) – “हे अल्लाह! मी तुझ्या निर्णयावर राजी आहे. मी तुझ्या अंशांत समाधानी आहे. हे माझे शेवटचे सजदा आहे.”

करबला हे फक्त युद्ध नव्हते, तर एका सत्यासाठी दिलेल्या बलिदानाचे प्रतीक होते. इमाम हुसैन अ.स. यांच्या वचने आजही अन्यायाविरोधात लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रकाशस्तंभ आहे
करबला युद्धात इमाम हुसैन (अ.स.)
१. सत्यासाठीचा आवाज:
“हे लोकांनो! तुम्ही मला का मारू इच्छिता? मी कुठले अन्याय केले आहेत? मी तुम्हाला केवळ सत्य, न्याय आणि इस्लामच्या मार्गावर चालण्यास सांगतो. जर तुम्हाला माझ्या शब्दांवर विश्वास नसेल, तर माझ्या कृतीवर तरी विचार करा.”
२. धार्मिक आणि नैतिक आवाहन:
“जर तुम्हाला धर्म नसेल, तर कमीत कमी माणुसकी जिवंत ठेवा. मी कुणावरही आक्रमण केले नाही, मी केवळ अत्याचाराविरुद्ध उभा आहे.”
३. आपल्या अनुयायांशी संवाद: “माझ्या सहकाऱ्यांनो! हा लढा फक्त तलवारीचा नाही, हा लढा श्रद्धेचा आहे. जे सत्यावर विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी आजची रात्र शेवटची असू शकते, परंतु त्यांचे कार्य अमर राहील.”
४. शत्रूंशी केलेले संवाद:
“ओ Yazidच्या लोकांनो! तुम्ही मला जगातल्या सत्तेसाठी मारू इच्छिता, परंतु जाणून घ्या – मृत्यू माझ्यासाठी सन्मानाचा आहे, आणि तुमच्यासाठी लाजिरवाणा.”
५. शहीदीपूर्वीचे अंतिम विचार:
“हे अल्लाह! तुझ्या मार्गासाठी मी सर्व काही अर्पण केले आहे – माझे कुटुंब, माझे प्राण, माझे साथीदार. सत्यासाठीचा हा बलिदान स्वीकार.”इमाम हुसैन यांचे करबला मधील प्रत्येक शब्द आणि कृती ही मानवतेला न्याय, प्रेम, आणि बलिदान शिकवते.

करबला युद्धादरम्यान इमाम हुसैन (अ.स.) यांनी अदा केलेली नमाज ही इस्लामी इतिहासातील एक अत्यंत भावनिक, प्रेरणादायी आणि शौर्यपूर्ण घटना आहे. ही घटना इस्लामी तत्त्वज्ञानात नमाजेची महत्त्वता दर्शवते.

करबला युद्धातील इमाम हुसैन यांची नमाज
इ.स. 680 मध्ये करबला मैदानात इमाम हुसैन (अ.स.) आणि त्यांच्या थोडक्या साथीदारांनी यझीदच्या हजारों सैन्याशी सामना केला. युद्धाच्या त्या अत्यंत तणावपूर्ण आणि जीवघेण्या परिस्थितीतही इमाम हुसैन यांनी नमाजेचा त्याग केला नाही.

अशराच्या दिवशीची नमाज (ज़ुहरची नमाज)
जेव्हा युद्ध जोरात सुरू होते, त्या दिवशी झुहरची वेळ आली. इमाम हुसैन (अ.स.) यांनी आपल्या साथीदारांपैकी काहींना सांगितले की, आम्हाला नमाज अदा करायची आहे. तेव्हा त्यांच्या काही साथीदारांनी शत्रूच्या हल्ल्यांपासून संरक्षण करत इमामांसोबत नमाज अदा केली.
✿ हबीब इब्न मज़ाहिर आणि सईद इब्न अब्दुल्ला यांसारख्या वफादार साथीदारांनी आपल्या शरीराने ढाल बनवून इमामांसाठी नमाज सुरक्षित अदा करण्याची संधी दिली.
✿ सईद इब्न अब्दुल्ला यांच्यावर अनेक बाण चालवले गेले, तरीही ते इमाम हुसैनच्या पुढे उभे राहून म्हणाले:
“माझं शरीर तुमचं कवच आहे, हुसैन!”
ते गंभीर जखमी झाले पण त्यांची शेवटची इच्छा एवढीच होती की, “इमाम नमाज पूर्ण करतात हे मी पाहू शकेन.”

नमाजेचा संदेश  – ही घटना मुसलमानांसाठी एक अमर संदेश आहे —
“नमाज कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाही.”
इमाम हुसैन (अ.स.) यांनी करबला मैदानात स्वतःच्या रक्ताच्या बदल्यातही नमाज जिवंत ठेवली.

करबलेतील नमाजेचे शिक्षण
1. नमाज हे इस्लामचे आधारस्तंभ आहे.
2. प्रत्येक परिस्थितीत नमाज अदा करणे हे फर्ज आहे.
3. त्याग आणि समर्पणाचे प्रतीक — नमाज आणि शहादत.

करबला मैदानाचा संदेश :
करबला हे केवळ युद्धाचे ठिकाण नव्हते, तर ते एक महान संदेश आणि अमर बलिदानाचे प्रतीक आहे. इमाम हुसैन (अ.स.) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करबला मैदानात जे धैर्य, निष्ठा, आणि सच्चाईसाठी बलिदान दिले, त्याचा संदेश आजही संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायक आहे.
करबला म्हणजे फक्त शोक नव्हे, ती आहे एक चैतन्यदायी क्रांती, जी आजही प्रत्येक सत्यप्रिय हृदयात धगधगते.”हुसैन सर्वांचा आहे – त्यांचा संदेश संपूर्ण मानवतेसाठी आहे.”

✍️ मुजाहिद मोहम्मद खलील काझी, करमाळा शहर काझी

मुजाहिद मोहम्मद खलील काझी
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!