'ग्राहक पंचायत'चे भालचंद्र पाठक यांचे निधन.. -

‘ग्राहक पंचायत’चे भालचंद्र पाठक यांचे निधन..

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – मध्य महाराष्ट्र ग्राहक पंचायत चे उपाध्यक्ष व ज्यांनी ग्राहक पंचायत साठी संपूर्ण आयुष्य वेचलं असे ग्राहक पंचायतचे भालचंद्र पाठक यांचे आज अकस्मात निधन झाले आहे. आजच ग्राहक पंचायत दिन साजरा होत असताना या दिवशी यातील श्री पाठक यांचे अकस्मात निधन झाले. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. ते सहकाऱ्याबरोबर बोलत असताना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. खासगी रूग्णालयात दाखल केले होते पण उपचार सुरू असतानाच पाठक सर यांचे निधन झाले.

करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर आणि त्या कालावधीमध्ये त्यांनी ग्राहक पंचायत चे काम सुरू केले होते. ग्राहक पंचांच्या कार्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले आहे. मागे काही वर्षांपूर्वी त्यांना अटॅक आला होता पण त्यातून ते सहीसलामत बचावले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली ,जावई, नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी ४ च्या दरम्यान त्यांच्यावर करमाळा येथील अमरधाम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, असे निकटवर्तीयांकडून समजले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!