वारकऱ्यांना भक्त निवासासह विविध सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावात – देवीचामाळ ग्रामपंचायतकडे मागणी

करमाळा (दि.२७): २८ जूनपासून आषाढी एकादशी निमित्त करमाळा शहर आणि कमलाभवानी मंदिर परिसरातून अनेक वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही कमलाभवानी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायाची गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून देवीचामाळ येथील रहिवासी आकाश महादेव सोरटे यांनी ग्रामपंचायत देवीचामाळ व सरपंच अमोल चव्हाण यांच्याकडे निवेदना द्वारे काही महत्त्वाच्या सुविधांची मागणी केल्या आहेत.

त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढील उपाययोजनांची विनंती करण्यात आली आहे:
- ग्रामपंचायत वाहनतळ परिसरातील गवत काढून संपूर्ण परिसराची स्वच्छता करणे
- सार्वजनिक स्वच्छतागृह खुले ठेवणे आणि स्वच्छ ठेवणे
- कचऱ्याची योग्य व्यवस्था करण्यासाठी कचराकुंड्या उपलब्ध करणे
- ९६ पायर्याची विहिरी परिसरात लाईटची व्यवस्था आणि फोकस लावणे
- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व भक्तनिवास वारकऱ्यांसाठी खुले ठेवणे

सदर मागण्या तातडीने अमलात आणाव्यात, जेणेकरून वारकरी भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, अशी स्पष्ट विनंती सोरटे यांनी केली आहे.
स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायतीने या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरीत कार्यवाही करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.






