देवळालीत बिबट्याच्या भितीमुळे शेतीपंपाची लाईट दिवस पाळी करण्यासाठी ग्रामस्थांच्यावतीने वीजवितरणला निवेदन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : देवळाली गावात बिबट्या आढळून आला असल्यामुळे देवळाली गावातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे, तरी देवळाली गावातील शेतीपंपाची लाईट रात्र पाळी चालू असून ती लाईट दिवस पाळी करण्यासाठी वीजवितरण कंपनी चे अधिकारी श्री.जाधव यांना देवळाली ग्रामस्थांच्यावतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी श्री.जाधव यांनी उद्या 10 फेब्रुवारी पासून देवळाली शेतीपंपाची लाईट दिवस पाळी सोडण्याचे आश्वासन दिले. यावेळी देवळाली गावचे सरपंच गहिनीनाथ गणेशकर ,उपसरपंच धनंजय शिंदे, ग्रामपंचायत सदस्य पोपट बोराडे ,बापू गुंड ,संदीप चव्हाण, माजी सरपंच आशिष गायकवाड व शेतकरी उपस्थित होते.