नमाज पठणानंतर शांततामय वातावरणात कुर्बानी करावी – हाजी कलिम काझी

करमाळा (दि.५) : नमाज पठणानंतर शांततामय वातावरणात कुर्बानी करावी, तसेच कुर्बानीचे फोटो किंवा व्हिडिओ चित्रीकरण करून सोशल मीडियावर प्रसारित करू नये, असे आवाहन शहर काझी हाजी कलीम काझी यांनी मुस्लिम बांधवांना केले. येत्या ७ जून रोजी, बकरी ईद (ईद-उल-अजहा) हा सण साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ७ जून रोजी, करमाळा शहरातील मौलाली माळ येथील ईदगाह मैदानावर सकाळी ८ वाजता नमाजपठण होणार आहे. कुर्बानीनंतर परिसरात स्वच्छता राखावी व शासनाच्या अटी व नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे तसेच शहर व तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी नमाजपठणासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या प्रसंगी ईमित्याज पठाण, मुस्तकीम पठाण, जमीर सय्यद, रमजान बेग, सुरज शेख, अॅड. न ईम काझी, समीर शेख, समीर बागवान, जहांगीर बेग, इकबाल शेख, फिरोज बेग, आलिम खान, अरबाज बेग, शाहीद बेग, कलीम शेख, अलीम शेख, सोहेल पठाण, अमीर शेख, सुपरान शेख, अय्युब शेख, इन्नुस मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते.




