अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त पिकांचे व मृत जनावरांचे पंचनामे तातडीने करा : आमदार संजयमामा शिंदे यांचे तहसील व कृषी अधिकाऱ्यांना सूचना.. - Saptahik Sandesh

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त पिकांचे व मृत जनावरांचे पंचनामे तातडीने करा : आमदार संजयमामा शिंदे यांचे तहसील व कृषी अधिकाऱ्यांना सूचना..


करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्यातील अनेक गावातील केळी ,पपई, आंबा, लिंबोणी आदी फळबागांबरोबरच तरकारी पिकांचे 28 एप्रिलला अचानक सुरु झालेल्या वादळामुळे व अवकाळी पावसामुळे नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेले असून वादळात झाडे अंगावर पडून काही जनावरेही मृत झालेली आहेत. सदर पिकांचे व मृत जनावरांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा अशा सूचना आमदार संजयमामा शिंदे यांनी प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. शिंदे यांना दिलेल्या आहेत.

करमाळा तालुक्यात 28 एप्रिल रोजी दुपारनंतर चिखलठाण, शेटफळ, वाशिंबे, उमरड, देवळाली, सरपडोह आदी जवळपास 30-35 गावांमध्ये वादळामुळे व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संपूर्ण तालुक्यातील नुकसानीचा सर्वे करून त्याचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावे अशा सूचना आमदार शिंदे यांनी दिलेल्या आहेत.

अंदाजे 600 हेक्टर क्षेत्र बाधित – संजय वाकडे (तालुका कृषी अधिकारी)
महसूल विभागाकडून आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष पंचनामे सुरू आहेत.तालुक्यातील कमी अधिक प्रमाणामध्ये नुकसान झालेल्या सर्वच गावातील पिकांचे पंचनामे केले जातील . अंदाजे 1200 शेतकरी व 600 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र कालच्या अवकाळी पावसामुळे व वादळामुळे बाधित झाल्याचा अंदाज आहे. संपूर्ण पंचनामे झाल्यानंतर 3 -4 दिवसांमध्ये एकूणच नुकसानग्रस्त क्षेत्राचा व पिकांचा अंदाज येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!