गाव बंद ठेवून जेऊर वीज वितरण कार्यालयासमोर केम ग्रामस्थांनी केले आमरण उपोषण -

गाव बंद ठेवून जेऊर वीज वितरण कार्यालयासमोर केम ग्रामस्थांनी केले आमरण उपोषण

0
जेऊर वीज वितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण करताना केम ग्रामस्थ

केम (संजय जाधव) – गावातील वीज समस्येच्या विरोधात एकजूट दाखवत केम (ता.करमाळा) मधील नागरिकांनी काल दि.२४ जून रोजी गाव बंद ठेवून जेऊर येथील वीज वितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण केले.

केम हे गाव कुंकवासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. मागील नऊ वर्षापासून येथील कुंकू कारखानदारांनी पाठपुरावा करून केम बे साठी जेऊर येथील 220 के व्ही सबस्टेशन मधुन स्वतंत्र 33 के.व्ही ची आठ किमी लाईन मंजूर करवून घेतली आहे. सदरील लाईनचे टेंडर देखील दोन वर्षापूर्वी पार पडले आहे. यानंतर अनेकवेळा पाठपुरावा करून सुद्धा प्रत्यक्ष काम सुरु न झाल्याने ग्रामस्थ व कुंकू कारखानदारां मध्ये तीव्र नाराजी होती.

जेऊर उपविभागत सर्वाधिक औद्योगिक वीज बील भरणा हा केम गावातून केला जात असून देखील  केमला विजेची समस्या कायम आहे. वीज पुरवठा नियमित न झाल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष होता. केम ग्रामस्थ, कुंकू कारखानदार व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने २४ जूनला गावची बाजारपेठ बंद ठेवून जेऊर वीज वितरण कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आमरण उपोषण करण्यात आले. या उपोषणात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उपोषण स्थळी आमदार नारायण पाटील यांनी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. त्यांनी या वीज लाईनच्या कामासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

वीज वितरण विभागाचे अधिकारी श्री.भोईर यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. केम कुंकू कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष त्रिंबक भिस्ते, सचिव अरविंद वैद्य,  मनोज सोलापूरे, गोरख खानट, धनंजय सोलापूरे यांच्याशी या कामासंदर्भात येणाऱ्या अडचणींवर व त्या सोडवण्याबाबत चर्चा केली.  त्यानंतर अधिकारी श्री.भोईर यांनी या लाईनचे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे व स्वतंत्र बे-ब्रेकर वरुन वीज पुरवठा कार्यान्वित करण्याचे लेखी पत्र दिले.

सरपंच सारिका कोरे यांनी लिंबूपाणी पिऊन उपोषण सोडले

त्यानंतर हे पत्र श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव मनोजकुमार सोलापूरे यांनी सर्व उपस्थित ग्रामस्थांना वाचून दाखवले आणि सर्वांचे संमतीने  हे उपोषण स्थगित करण्यात आले. उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी देऊन सायंकाळी पाचच्या सुमारास उपोषणाची सांगता करण्यात आली.

या प्रसंगी सरपंच सारिका कोरे, उपसरपंच सागर कुराडे, माजी सरपंच अजितदादा तळेकर, माजी सभापती शेखर गाडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सागर दौंड, उपाध्यक्ष सागर तळेकर, अच्युत पाटील, महेश तळेकर, संदीप तळेकर, नितीन खटके, गोरख पारखे, गोरख खानट, श्रीहरि तळेकर, विजयकुमार बलदोटा, धनंजय सोलापूरे, गोपी शिंदे, भालचंद्र गुटाळ, महावीर तळेकर, बापुराव नेते तळेकर, पी. पी. वासकर, महेश घाडगे, अक्षय गोडसे, काका भिस्ते, किरण तळेकर, दत्ता तळेकर, सुभाष कळसाईत, अनिल भिस्ते, बाळासाहेब देवकर, दत्ता बिचितकर, भैरू शिंदे, अरविंद वैद्य, सुदर्शन भिस्ते, गणेश शिंदे, विजय ओहोळ, सचिन बिचितकर, बाळू बिचितकर, अरविंद येवले, शुभम शिंदे यांच्यासह कुंकू कारखान्यांतील कामगार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!