महायुती सरकारच्या योजना ‘भाजपा’पदाधिकारी, बुथ प्रमुखांनी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत : आ.सुभाष देशमुख

करमाळा / संदेश प्रतिनिधी : महायुती सरकारच्या जास्तीत जास्त योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, बुथ प्रमुख यांनी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत व येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून करमाळा तालुक्यात कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन आमदार सुभाष बापू देशमुख यांनी केले.
भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये करमाळा तालुक्यातील देवळाली येथे संपन्न झाला.
या मेळाव्याचे आयोजन भाजपा सोलापूर जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी केले होते,या मेळाव्यामध्ये आमदार सुभाष बापू देशमुख यांनी भारतीय जनता पार्टी व महायुती सरकारने आतापर्यंत केलेल्या लोक उपयोगी योजना तसेच आता झालेल्या अर्थसंकल्प तील जनतेच्या हिताचे निर्णय सांगितले व महायुती सरकारच्या जास्तीत जास्त योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, बुथ प्रमुख यांनी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत व येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून करमाळा तालुक्यात कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना केल्या.
कमळ या चिन्हावर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल या दृष्टिकोनातून काम करावे असे उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, दिग्विजय बागल, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, उमेश मगर,संजय घोरपडे आदींची भाषणे झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक चव्हाण, नितीन झिंजाडे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांनी मानले तर सुत्रसंचलन विनोद महानवर यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष अफसर तात्या जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, काकासाहेब सरडे, शशी कल्याणी, डॉ.अभिजीत मुरुमकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल पवार, देवळालीचे शहाजी पाटील, संदिपान कानगुडे, भैया गोसावी, नितीन कानगुडे, सचिन कानगुडे, लखन शिंदे, धनंजय चोपडे उपस्थित होते.


