घरकुल योजनेसाठी 31 मेपर्यंत सर्व्हेची मुदत -

घरकुल योजनेसाठी 31 मेपर्यंत सर्व्हेची मुदत

0

करमाळा(दि.२४): प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेघर तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांचा आवास प्लस २०२५ सर्व्हेक्षण सध्या करमाळा तालुक्यात सुरू आहे. शासनाने या सर्व्हेसाठीची अंतिम मुदत वाढवून ती आता ३१ मे २०२५ पर्यंत केली आहे. ज्या कुटुंबांना आजपर्यंत घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा गरजू व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपले सर्व्हेक्षण तात्काळ करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तालुक्यांतील सर्व ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमार्फत हे सर्वेक्षण सुरू आहे.  याचबरोबर नागरिक स्वतः देखील मोबाईल मध्ये आवास प्लस 2024 सर्व्हेक्षण या ॲप द्वारे सर्व्हेक्षण करू शकतात.  या सर्व्हेक्षणासाठी 31 मे 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जी कुटुंब अद्याप ही सर्व्हेक्षण पासून वंचित आहेत त्यांनी सर्व्हेक्षण करून घ्यावे, कोणत्याही लाभार्थ्यांला अडचण आली तर त्यांनी माझ्याकडे संपर्क साधावा.

ॲड. राहुल सावंत, माजी पंचायत समिती सदस्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!