राज्यात सत्ता परिवर्तनाची सुरुवात झाली असून काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी संधीचा फायदा घेवून कामाला लागावे – आमदार रविंद्र धंगेकर..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : देशात राज्यात सध्या सत्ता परिवर्तनाची सुरुवात झाली असून काॅंग्रेस पक्षाला चांगले दिवस आल्याने बदलाची सुरूवात कसब्यातुन सुरु झाली आहे, कार्यकर्त्यानी‌ या संधीचा फायदा घेवुन‌ कामाला लागावे असे आवाहन कसबा पेठचे पुणेचे आमदार विकास धंगेकर यांनी व्यक्त केले.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या वाढदिवसानिमीत्त काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते व्यासपिठावर काॅग्रैंसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर, उपसभापती चिंतामणी जगताप, प्रा. रामदास झोळ, राजाभाऊ देशमुख, जामखेड तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले माजी नगरसेवक राहुल जगताप, अभिषेक आव्हाड जिल्हा संघटक हरीभाऊ मंगवडे शहराध्यक्ष सुजय जगताप ओ बी सी तालुकाध्यक्ष गफुर शेख आदी उपस्थित आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की लोकनेता होण्यासाठी जनतेच्या मनामध्ये आपले स्थान घट्ट करून लोकनेता होण्यासाठी जनतेमध्ये जाऊन काम करा जनता तुम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून आमदार केल्याशिवाय राहणार नाही असे मत कसबा पुणे चे आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले.करमाळा येथे काँग्रेस आय करमाळा तालुका काँग्रेस कार्यालयाचे उद्घघाटन काँग्रेसचे अध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या वाढदिवसाच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला असून जनतेचे काम करत लोकांच्या हृदयामध्ये आपण स्थान निर्माण केले आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता ते आमदार यशस्वी प्रवास केला आहे. काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्याचा पक्ष असुन देशाला स्वांतत्र करण्यासाठी त्याचे मोठे बलिदान आहे.देश उभा करण्यासाठी त्यागाची परंपरा असलेला पक्ष असून या पक्षाने सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदु मानुन राजकारण केलेले आहे. सर्वसामान्यांचे भले करण्याचे ताकद काँग्रेसमध्ये असून जनतेच्या मनामध्ये भाजप विषयी प्रचंड चीड आहे भाजप सरकारने हे घोषणांचे सरकार असून सर्वसामान्य जनतेला महागाईच्या लोटण्याचे काम या सरकारने केलेले आहे शेतकरी सर्वसामान्य जनता मराठा आरक्षणाचे प्रश्न ओबीसी वर्ग यांचे प्रश्न या सर्व प्रश्नांची उत्तरे या सरकारकडे नाहीत, त्यामुळे संपूर्ण देशामध्ये काँग्रेसला वाढता जनाधार मिळत असून बदलाची वारी संपूर्ण देशभर पाहणार असल्याचे चित्र सध्या दिसत असून बदलाची सुरुवात कसबा पुणे येथून झाले असून. याच्या 2024 आघाडीचे सरकार राज्यात तसेच केंद्रातही काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

या संधीचा आपण फायदा उठून सर्वसामान्य जनतेचे काम करा जनता तुमच्या कामाची पावती देईल माझे स्वतःचे उदाहरण आपणांसमोर आहे तरी येत्या काळामध्ये कार्यकर्त्यांनी आळस झटकून कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चोपडे यांनी केले तर आभार माजी नगरसेवक राहूल जगताप यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!