BSNL टॉवर असून अडचण नसून खोळंबा

केम (संजय जाधव) – दूरध्वनी सेवा पुरवणाऱ्या विविध कंपन्यांनी त्यांचा रिचार्ज प्लॅन नुकताच सुमारे 15% ने वाढविले आहेत. अशा परिस्थितीत BSNL या निमसरकारी कंपनीच्या रिचार्ज दरात बदल झालेले नाहीत. तसेच नुकतेच बीएसएनएल आणि टाटा यांच्यामध्ये दूरध्वनी सेवेबाबत 15000 कोटींचा करार झाला असल्याने BSNL च्या सेवेत सुधारणा होण्याची अपेक्षा लोकांना वाटत आहे. यामुळे अनेक लोक आपला मोबाईल नंबर बीएसएनएलकडे पोर्ट (हस्तांतरण) करण्याचा विचार करत आहेत. केम गावात बीएसएनएल कंपनीचा टाॅवर व ऑफीस आहे. पूर्वी केम भागात BSNL लँडलाईन सेवा पुरवीत होते. परंतु मोबाईल युग सुरू झाल्यानंतर व लँडलाईन सेवेचा वापर बंद झाल्याने त्यांनी केम येथील ऑफिस बंद केले. त्यामुळे आता केम मध्ये BSNL टाॅवर असून रेंज मिळत नाही. त्यामुळे हे BSNL चा tower असून अडचण नसून खोळंबा झाला असल्याचे लोकांतून बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी एअरटेल, जीवो, VI या खासगी दूरध्वनी कंपन्यांनी रिचार्ज दरात वाढ केल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत BSNL कडे नागरिक आर्कषीत होऊ लागले आहेत. परंतु केम येथील BSNL टाॅवरला रेंज नाही. त्यामुळे नागरिकातून नाराजी निर्माण झाली आहे. टाॅवर सुरू झाल्यास मोठया प्रमाणावर ग्राहकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे BSNL ने केम मधील हा टाॅवर सुरू करून ग्राहकांची सोय करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.




