किरकोळ कारणावरून मुलाकडून वडिलांना बेदम मारहाण…


करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा (ता.23) : वडीलांनी मुलास दारातील सरपण पावसाने भिजेल, ते घरात टाक असे म्हटल्याचा राग मुलास आला, त्यानंतर मुलाने लाकडी काठी घेवून वडिलांना बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार आळजापूर (ता.करमाळा) येथे काल (ता.22) रात्री आठ वाजता घडला आहे.

याप्रकरणी आप्पासाहेब अर्जून घोडके यांनी पोलिसात फिर्याद दिली असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी बाहेरून रात्री आठ वाजता घरी गेलो, त्यावेळी दारामध्ये माझा मुलगा कशिश व माझी आई बसले होते. त्यावेळी दारात पडलेले सरपण पावसाने भिजेल ते घरात नेवून ठेव असे मुलास म्हणालो असता, मुलाला राग आला व त्याने मला शिव्या देवून, सरपणातील एक लाकूड घेवून माझ्या डोक्यावर नाकावर व तोंडावर मारहाण करून मला जखमी केले.

त्यानंतर माझ्या आई-वडिलांनी माझी सुटका केली, त्यानंतर मला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!