२०२४ ला जर आमदार झालो तर करमाळा तालुक्याचं नंदनवन केल्याशिवाय मी राहणार नाही – माजी आमदार नारायण पाटील

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : २०२४ ला तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मी जर आमदार झालो तर या तालुक्याचं नंदनवन केल्याशिवाय मी राहणार नाही असे वक्तव्य करमाळा-माढा मतदारसंघाचे माजी आमदार नारायण पाटील यांनी शुक्रवारी( दि.२१ जुलै) वांगी नंबर २ येथे केले. यावेळी वांगी नंबर २ च्या विविध विकास कामांचे उद्घाटन माजी आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, २०१४ ते २०१९ या कालावधीमध्ये करमाळा तालुक्यात साडेबाराशे कोटीची मी कामे केली आहे. २०१९ पासून करमाळा तालुका विकास कामांपासून वंचित झाला आहे. २०२४ ला तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मी जर आमदार झालो तर या तालुक्याचं नंदनवन केल्याशिवाय मी राहणार नाही.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, अर्जुन सरक, केमचे माजी सरपंच अजित तळेकर यांची भाषणे झाली. केमचे माजी सरपंच अजित तळेकर यांनी वांगी नं.२ साठी दहा लाख निधी देण्याचे सभेमध्ये जाहीर केले.
यावेळी वांगी नंबर २ चे सरपंच सतीश चौधरी, युवा नेते गणेश बापू जाधव, उपसरपंच बशीर पटेल, केमचे सरपंच अजित तळेकर, पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, माजी सभापती शेखर गाडे, जिल्हा परिषद सदस्य बिबीशन आवटे, धुळाभाऊ कोकरे, शेलगावचे सरपंच अमर ठोंबरे, मुंबई महापौर केसरी विजय गुटाळ, ऋषिकेश पाटील, विनोद गरड सर, सागर पोरे, पंचायत समिती माजी उपसभापती गणेश चौधरी, दत्ता बापू देशमुख, विकास पाटील, गणेश पाटील, वैभव पाटील, पोपट सातव, भाऊ गोडसे, दहिगाव चे सरपंच संजय गलांडे, आप्पा लोखंडे, सुरेश नरूटे, सचिन साळुंखे,भाऊ तावसे,सोनू होनमाने हे उपस्थित होते.
याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सुरेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुनील ढावरे,युवा नेते बळणाथ रनसिंग,विशाल तकिक,दादा माने, रविराज देशमुख, नामदेव महाडिक, महादेव तकिक, यशवंत तकिक, अशोक तकीक, अशोक खराडे, बापूराव खराडे, प्रदीप जगताप, बालाजी जाधव, नामदेव सपकाळ, गणेश भानवसे, हनुमंत भानवसे, उस्मान पटेल, बप्पा महाडिक, राजाभाऊ चौधरी, सचिन जाधव, नवनाथ जाधव, प्रवीण आबा जाधव, मारुती तकीक, धनाजी चौधरी, अमोल खराडे, आबा खराडे, अमोल सातव अनिल सातव, रमेश पन्हाळकर, सचिन चौरे, बापू पन्हाळकर, बापू तोडकर, नवा तोडकर, दादा सातव, विनोद ढाणे ,अनिल देवकर ,महेश गणगे, शंकर मोरे ,भाऊ मोरे ,सतीश कोथमीरे, वैभव देशमुख, राहुल रणसिंग, सचिन रणसिंग, राजेंद्र रणसिंग, तय्यब पटेल, सुहास चौरे ,नाना चौरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल तकीक यांनी केले तर आभार गणेश जाधव यांनी मानले.कार्यक्रमानंतर स्नेहभोजन पार पडले.


