शेतमालाला भाव द्या, शेतकरीच सरकार चालवायला पैसे देतील - जगताप यांनी केली महायुती वर केली कडाडून टीका -

शेतमालाला भाव द्या, शेतकरीच सरकार चालवायला पैसे देतील – जगताप यांनी केली महायुती वर केली कडाडून टीका

0

करमाळा (दि.१०) – महायुती सरकार महिला, युवक, शेतकरी यांना वेगवेगळ्या योजनेतून तूटपुंजे पैसे देऊ करत आहे. आम्ही काय भिकेवर जगायचे का? असल्या योजनांमधून पैसे देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्या. शेतकरीच सरकार चालवायला पैसे देतील असे वक्तव्य करत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी कंदर येथील सभेतुन महायुतीवर निशाणा साधला. ८ सप्टेंबर ला ही सभा झाली.

कंदरच्या सभेतील क्षणचित्रे

आपल्या भाषणातुन त्यांनी मुख्यमंत्री व महायुतीवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, काल मुख्यमंत्र्यांची करमाळा येथे सभा झाली, त्यावेळी सभेला पाचशे रुपये पैसे देऊन महिलांना आणण्यात आले होते. पुरुषांचा रेट वेगळाच होता. लोकसभेमध्ये लाडक्या दाजींनी हातात दांडके घेतल्यामुळे महायुती सरकारला विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांना लाडक्या बहिणींची आठवण झाली व त्यामुळे लाडकी बहीण योजना आणली.  पंधराशे रुपये मध्ये काय होते. महिन्याला पंधराशे म्हणजे दिवसाला पन्नास रुपये देत आहेत. महागाई एवढी वाढलेली आहे पन्नास रुपयांमध्ये काय येत आहे? युपी बिहार वरून आलेले मोलमजुरी करणारे युवक दिवसाला दीडशे ते दोनशे रुपयांचा गुटखा मावा खाण्यावर पैसे खर्च करतो. मोलावर येणारा मजूर दिवसाला दोन तीनशे रुपये खर्च करत असेल तर तुम्ही देत असलेल्या पन्नास रुपयात आम्ही काय करायचं ही सगळी फसवेगिरी आहे असे म्हणून त्यांनी या योजनांवर व महायुतीवर कडाडून टीका केली. महायुतीचे सरकार जरी परत आलं तरी त्यांना देखील ही योजना पुढे चालवणं शक्य होणार नाही कारण वर्षाला ४६  हजार कोटींचा खर्च या योजनेवर होत आहे ज्यामुळे अनेक विकास कामे रखडलेली आहेत.

आमदार शिंदे यांच्यावर देखील केली टीका

विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर टीका करताना जगताप म्हणाले की, मतदारसंघात 3000 कोटींचा जो विकास झाला आहे तो मतदारसंघाचा नसून त्यांनी स्वतःचाच विकास करून घेतलेला आहे.  छत्तीस गावातून एक लाख मते आहेत, विरोधकांना पुन्हा निवडणूक लढवण्याची तलफ होणार नाही अशा वाक्यांचा देखील त्यांनी समाचार घेतला. शिंदे याच्यामध्ये अहंकार निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले.  गावातल्या सरपंच पदापासून विविध राजकीय पदे ही कार्यकर्त्यांना न देता त्यांच्या घरातील व्यक्तींनाच दिली जात आहेत. माढ्याहून आणलेले हे पार्सल आपल्याला परत पाठवायचं आहे असे ते देखील ते म्हणाले.

भाऊ मराठा आरक्षणावर बोला..

जयवंतराव जगताप यांचे भाषण सुरू असताना जनतेतून एका व्यक्तीने मध्येच त्यांना थांबवून मराठा आरक्षणाविषयी बोला अशी विनंती केली. त्यावेळी जयवंतराव जगताप म्हणाले की राजकारण्यांनी हे एक पिल्लू सोडलेला आहे.
जातीय तेच रान करून तुमच्या आमच्या मध्ये फळी निर्माण करून राजकारण्यांना आपली पोळी भाजायची आहे. या गोष्टीपासून सर्वांना सावध राहण्याची वेळ आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.मराठा आरक्षण मिळावं यासाठी तुम्हाला तुतारी फुंकायची आहे.  नारायण आबांना निवडून दिलं तर ते मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारकडे मांडतील. 

मुस्लिम बांधवांचे कौतुक :

 कंदर येथे मुस्लिम बांधवांची संख्या जास्त आहे. राम रहीम एक है, इमान का नाम मुसलमान है, मुसलमान कभी बिकता नही असे म्हणत मुस्लिम समाजाला आकर्षित करण्यासाठी जगताप यांनी आपल्या भाषणातून  वेगवेगळे उदाहरणे दिली. मराठा आरक्षणाला देखील मुस्लिम समाजाने वेगवेगळ्या माध्यमातून पाठिंबा दिलेला आहे. असे देखील त्यांनी उल्लेख केला.  हिंदू खतरे मे है, असे बोलणारे ते स्वतःच खतरेमे आहेत असे ते म्हणाले. मुसलमान बांधवांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांना भरघोस मतांनी मतदान करण्याचे आवाहन केले.

बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळेस जी बंडखोरी झाली त्यात माझा काहीही हस्तक्षेप नव्हता – नारायण पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!