निवडणुकीत मला शून्य मतं मिळाली पाहिजेत – भर सभेत उमेदवाराने केले जनतेला आवाहन

0

करमाळा (दि.११) –  निवडणुकीत मला शून्य मतं मिळाली पाहिजेत याची काळजी सर्व जनतेने, नातेवाईकांनी,मित्र मंडळींनी घ्यायची आहे असे आवाहन करमाळा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार ॲड.मोहम्मद जमीर कलिंदर शेख यांनी वांगी येथील महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांच्या सभेत केले. काल (दि.१०) करमाळा तालुक्यातील वांगी३ येथे ही सभा पार पडली.

शेख हे करमाळा तालुक्यातील जिंती गावचे असून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की,  करमाळा विधानसभेची ही निवडणूक अतिशय अटीतटीची झालेली आहे. मी निवडणुकीबाबत अतिशय सिरीयस आहे.मला मिळणाऱ्या दोन-चार हजार मतांचा फटका नारायण आबांना बसू नये म्हणून मी त्यांना पाठिंबा द्यायचे ठरविले आहे. मला एकही मत मिळाले नाही पाहिजे याची काळजी सर्व जनतेने,  नातेवाईक, मित्रमंडळी यांनी घेतली पाहिजे. माझी सर्व मते नारायण आबांना द्यावीत.

सभेत बोलताना अ‍ॅड.शेख

मी जयवंतराव भाऊ यांचे कंदर सभेतील भाषण ऐकले आणि त्या भाषणानंतरच नारायण पाटील यांना पाठिंबा द्यायचे ठरविले. जयवंतरावभाऊ यांच्या नर्सरी मधून आमदार खासदार, जिल्हा परिषद सदस्य, मार्केट कमिटी डायरेक्टर हे तयार होत असतात. म्हणून मी माझे ऍडमिशन भाऊंच्या नर्सरी मध्ये निश्चित केले आहे. या पाच वर्षांमध्ये अनेक इलेक्शन होणार आहेत त्यावेळी मला नारायण आबांकडून पाठिंबा अपेक्षित आहे.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार जयवंतराव जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. नारायण पाटील यांनी शेख यांचा हार घालून सन्मान केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!