करमाळा येथे भागवत ज्ञानयज्ञ कथा सोहळ्याचे उत्साहात आयोजन

करमाळा (दि.२६) – करमाळा शहरातील श्री गजानन महाराज मंदिराच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त २१ डिसेंबर ते २७ डिसेंबर प्रसिद्ध दरम्यान भागवत कथाकार साध्वी अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर यांच्या भागवत ज्ञानयज्ञ कथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गजानन महाराज मंदिर समितीच्या वतीने श्रीमती रंजना कुरुलकर यांच्यावतीने हे आयोजन करण्यात आले असून यजमानपद सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर, त्यांच्या पत्नी नगरसेविका संगीता खाटेर यांना देण्यात आले आहे.
भागवत कथेच्या प्रारंभी साध्वी परमपूज्य अनुराधा पंढरपूर यांची रथामधून करमाळा शहरातून बॅन्ड पथकासह भव्य सवाद्य मिरवणूक शोभायात्रा काढण्यात आली. तसेच भागवत कथेत श्रीकृष्ण जन्म सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे संयोजन संकेत खाटेर मोक्षा खाटेर चि.खुश यांनी केले असून श्रीकृष्ण जन्म सोहळ्यात भाविकांनी नृत्य करीत श्रीकृष्ण नामाचा गजर करीत आनंदात उत्सव साजरा केला.
भागवत ज्ञानयज्ञ कथा सोहळा यशस्वीपणे संपन्न होत आहे. भागवत कथा समाप्ती शुक्रवारी २७ डिसेंबरला होणार असून भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे तरी याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनानंतर बऱ्याच वर्षानंतर करमाळ्यात भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा होत असून भाविक भक्तांनी या कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानुन कौतुक केले आहे.
भागवत कथा यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी गजानन महाराज मंदिर समितीचे पुजारी रवींद्र विद्वत, प्रदीप देवी, शशिकांत कुलकर्णी,नितेश देवी, संकेत खाटेर सौ.मोक्षा खाटेर वर्धमान खाटेर, नरेंद्रसिंह ठाकुर, दिनेश मडके गिरीश शहा ,गंधे काका,संतोष काका कुलकर्णी,स्वाती मसलेकर ,मनीषा मसलेकर,ॲड लता पाटील, मेघाली आडकर सुरेखा घाडगे, स्वाती कापसे उषा महाजन ,शैलजा भणगे ,शुभदा शिलवंत, सुरेखा घाडगे, उषा महाजन यांनी परिश्रम घेत आहेत.
यावेळी बोलताना साध्वी भागवत कथाकार साध्वी अनुराधा शेटे पंढरपूरकर यांनी सांगितले की, भागवत कथा ही कल्पवृक्षासारखी आहे जी आपल्या इच्छा पूर्ण करते.कथा म्हणजे कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्यासारखे आहे. श्रीमद भागवत कथेचे केवळ स्मरण केल्याने आपली सर्व पापे नष्ट होतात आणि आपल्याला अनंत पुण्य प्राप्त होते. देवांनाही श्रीमद भागवत कथा ऐकण्याची इच्छा असते. आणि मानवाला या कथेचे लाभ आणि आशीर्वाद सहज मिळू शकतात. केवळ श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याने मानवाचे जीवन पूर्णतः कल्याणकारी होते. आणि दुःख दूर होते. भागवत कथा ऐकल्याने आपले मन आणि शरीर शुद्ध होते असे म्हणतात. जो व्यक्ती भागवत कथा ऐकतो त्याला सुख-शांती प्राप्त होते. म्हणून माणसाने सतत श्रीकृष्ण भगवंताची आराधना व उपासना करावी आणि आयुष्यात एकदा तरी भागवत कथा ऐकावी. श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याने आपल्या जन्मजन्मातील पापे नष्ट होतात व ती श्रवण केल्याने मनाचा आध्यात्मिक विकास होतो. आणि जिथे इतर युगात मोक्षप्राप्तीसाठी कठोर परिश्रम आणि परिश्रम करावे लागले, तिथे कलियुगात श्रीमद भागवत कथा ऐकूनच मोक्ष प्राप्त होतो.




