गुणवंत विद्यार्थी व अंगणवाडी मदतनीसांचा २७ जूनला करमाळ्यात गौरव सोहळा

करमाळा: तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळावी आणि समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या अंगणवाडी मदतनीसांचे कार्य गौरवले जावे, या उद्देशाने तालुका व जिल्हा बहुजन मराठी पत्रकार संघाच्यावतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन दि. २७ जून २०२५ रोजी, शुक्रवारी करमाळा येथील पंचायत समिती सभागृहात करण्यात आले आहे.

सलग चार वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम करमाळा तालुक्यात एक सकारात्मक पायंडा पाडणारा ठरला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्याचा व अंगणवाडीत कार्यरत असलेल्या मदतनीस महिलांना त्यांच्या सेवेचा योग्य गौरव करण्याचा दुहेरी हेतू संघाने ठेवलेला आहे. लहानग्यांच्या आरोग्य व पोषणासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका-मदतनीस यांच्या योगदानामुळे समाज मजबूत होत असल्याची जाणीव यानिमित्ताने सर्वांना करून दिली जाणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम असून, धाराशिव जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत, गणेशभाऊ करे पाटील (अध्यक्ष – यश कल्याणी सेवा भावी संस्था), पोलीस निरीक्षक रणजित माने, डॉ. निलेश मोटे (मोटे हॉस्पिटल), ॲड. डॉ. बाबुराव हिरडे (अध्यक्ष – ग्राम सुधार समिती), किरण सूर्यवंशी (बालविकास प्रकल्प अधिकारी), आतकर मॅडम (मा. पर्यवेक्षिका), अंक्रुर शिंदे (माजी सैनिक, तालुका अध्यक्ष), भारती प्रचंडराव (पर्यवेक्षिका), विलास नाईकनवरे (सुभेदार मेजर, इंडियन आर्मी, संस्थापक – योद्धा करिअर अकॅडमी, जेऊर) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात बहुजन मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पंडित हणुमंते, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आप्पा लोखंडे, मास संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुर्यकांत ताडलापूरकर, स्वराज्य न्यूजचे संपादक प्रकाश आरडे, महिला जिल्हाध्यक्षा आशाताई चांदणे, जिल्हा महिला उपाध्यक्षा प्रमिला जाधव, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भिसे, जिल्हा सचिव आबासाहेब झिंजाडे, तालुका अध्यक्ष प्रमोद खराडे, ता. उपाध्यक्ष दादासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष संभाजी शिंदे, संजय चांदणे, माधुरी कुंभार, हिराबाई देमुंडे, सुवर्णा निंबाळकर, सचिन नवले, श्रीमंत दिवटे आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून शिक्षण व बालविकास या क्षेत्रातील योगदानाची दखल घेत एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न पत्रकार संघाच्या वतीने केला जात आहे. यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा महिला अध्यक्ष सौ. आशाताई चांदणे यांनी केले आहे.




