अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थामार्फत स्वांतत्रवीर सावरकर यांची 140 वी जयंती साजरी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा यांचेमार्फत स्वांतत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांची 140 वी जयंती साजरी करण्यात आली, यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन माजी सैनिक हनुमंत जगताप राजुरी यांच्या हस्ते करण्यात आले व प्रतिमापूजन तालुक्याचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी बोलताना नारायण आबांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लढ्यात वीर सावरकर यांचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांच्यातर्फे आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, सावरकर हे थोर राष्ट्रभक्त, प्रखर विज्ञानवादी बुद्धिवंत होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी आपल्या आयुष्याची आहुती देऊन राष्ट्रनिष्ठेशी कोणतीही तडजोड केली नाही, अत्यंत धैर्याने विपरीत परिस्थितीत ब्रिटिशांशी त्यांनी सशस्त्र संघर्ष केला. त्यांचा आदर्श ठेवून देव देश आणि धर्मासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी जागृत आणि गरजेचे आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच गोशाळेत जाऊन गाईंना चारा वाटप करण्यात आला, या कार्यक्रमास बाळासाहेब होशींग राजेंद्र सूर्यपुजारी पत्रकार दिनेश मडके आबासाहेब टापरे शिवाजी जाधव गणेश जाधव मृदुंगाचार्य किशोर जाधव राजेंद्र भोसले मेजर हनुमान जगताप मनोज कुलकर्णी दर्शन कुलकर्णी नरेंद्र ठाकूर ठाकूर श्याम शिंधी अमर साळुंखे शुभम कुलकर्णी पंकज अंदुरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन नरेंद्र ठाकूर यांनी केले.