केम येथे निवृत्तीनाथांच्या पालखीचे तोफांची सलामी देऊन स्वागत

केम (संजय जाधव) – पंढरपूर येथून पौर्णिमा चा काला घेऊन त्र्यंबकेश्वरला निघालेल्या पालखीचे परतीच्या मार्गावर केम येथे दि. 23 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता आगमन झाले. या वेळी केम ग्रामस्थ व श्री राम भजनी मंडळ यांच्या वतीने तोफांचा सलामीने जोरदार स्वगत करण्यात आले.
त्यानंतर पालखी श्रीराम मंदिराकडे निघाली यावेळी संपूर्ण केम नगरी निवृत्ती नाथ महाराज की जय अशा नाम घोषाने दुमदुमून गेली भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पालखी श्रीराम मंदिरात प़ोहचल्या नंतर श्रीची आरती झाली त्यानंतर वाटचालीचे कीर्तन झाले. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्याना जेवण दिले दिलें त्यानंतर गावकऱ्याचा जागर झाला. सकाळी ठिक सात वाजता ग्रामस्थांच्या पुजा झाल्या त्यानंतर माजी जि.प.सदस्य संजय देवकर, बाबा मोरे लक्षमण बिचितकर, अरूण ससाने कुंडलिक तळेकर यांचे वतीने सकाळी नाष्टा दिला त्यानंतर पालखीने निंभोरे कडे प्रस्थान केले. वाटेत दौंड वस्तीवरिल नागरिकांनी श्री ची पुजा करून वारकऱ्याना अल्पोहार दिला. दिंडीला निरोप देण्यासाठी केम येथील भाविक मोठया संव्खेने उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने वारकऱ्याना सर्व सोयी उपलब्ध केल्या होत्या.

आषाढी वारीला जाताना काय त्रास झाला नाही परंतु परतीच्या मार्गावर निमगाव ते केम हा रस्ता अतिशय खराब आहे त्यामुळे वारकऱ्याना चालताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या. तसेच रथाची बैल मेटाकुटिला आली होती. शासन तर म्हणतय सर्व पालखी मार्गाचे रस्ते करणार आज आम्ही या मार्गावर परतीच्या प्रवासाला किती वर्ष झाल तरी हा रस्ता आहे तसाच आहे. या भागाचे आमदार साहेबांनी पुढच्या वर्षी पर्यत हा मार्ग करावा अशी सद्बुद्धी निवृत्ती नाथांनी दयावी
– ह.भ.प.गोसावी महाराज, त्रंबकेश्वर, नाशिक



