ग्राहकाचा वीज पुरवठा सुरळीत करा-ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचाचा आदेश -

ग्राहकाचा वीज पुरवठा सुरळीत करा-ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचाचा आदेश

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा, ता. १६: वीज वितरण कंपनीने ग्राहकाचा वीज पुरवठा ४५ दिवसात नवीन रोहित्र बसवून व क्षमता वाढवून सुरळीत करा, असा आदेश ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचाने दिला आहे.

यात हकीकत अशी, की मौजे पोंधवडी येथील रहिवासी दादा परबत राऊत हे सध्या कृष्णानगर ,ता.गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर  येथे रहात आहेत. ते जिथे रहात आहेत, त्या भागात विजवितरण कंपनीची वीज पुरवठा सुरळीत नाही,या भागात फ्युज टिकत नाही, दिवसभरात सहा ते सात वेळा विद्दुतपुरवठा बंद पडतो, पहाटेवेळी विद्दुतपुरवठा बंद पडला तर पाच ते सहा तास कोणीही कर्मचारी येत नाहीत, वीज मिळत नाही,त्यामुळे विद्यार्थांचा अभ्यास बुडतो, फ्युज गेल्याने घरातील बल्ब, एल.ए.डी, मिक्सर जळतात. याबाबत संबधित महावितरण अधिकाऱ्यांना वारंवार लेखी निवेदन देवून, समक्ष भेटून, मेसेज देवूनही व स्मरणपत्र देवूनही कोणतीही कारवाई केली  नाही. त्यामुळे त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचाकडे तक्रार दिली होती. त्यावेळी महावितरण ने उत्तर देवून जादा लोड असल्यामुळे काही प्रमाणात अडचणी येत असल्याचे मान्य केले होते .

. त्यानंतर चौकशी करून ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचाचे तांत्रीक सदस्य मकरंद कुलकर्णी व सदस्य प्रसाद कोकीळ यांनी १२ मार्च २०२४ रोजी महावितरण कंपनीला आदेश केला, की अर्जदारास नियमानुसार विनाव्यत्यय सुरळीत विद्दुत पुरवठा करण्यात यावा, त्यासाठी नवीन ५ एमव्हीओ चे रोहीत्र, तसेच कृष्णानगर येथील रोहित्र क्षमता २०० केव्हीए वरून ३१५केव्हीए करा, तसेच १०० केव्हीए चे नवीन ट्रानस्फॉर्मर बसवा या सर्व बाबी ४५ दिवसात पुर्ण करा व या आदेशाचा अनुपान केल्याचा अहवाल मंचास सादर करा असेही त्यात म्हटले आहे.

दादा राऊत यांचा प्रयत्न अनुकरणीय आहे. त्यांचे ग्रामसुधार समितीने  विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!