शासनाने रावगाव परिसरात टंचाईच्या उपाययोजना तात्काळ राबवाव्यात - ग्रामपंचायत सदस्या प्रिती बुधवंत -

शासनाने रावगाव परिसरात टंचाईच्या उपाययोजना तात्काळ राबवाव्यात – ग्रामपंचायत सदस्या प्रिती बुधवंत

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : यावर्षी करमाळा तालुक्यात कमी पाऊस झाल्याने टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, सध्या लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेले असतानाच राजकीय मंडळी या निवडणुकीत मसगुल्ल आहेत ग्रामीण भागात शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत या निवडणुकीमुळे राजकीय नेत्यांना या समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही तेव्हा शासनाने ग्रामीण भागातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत रावगाव ग्रामपंचायतीच्या सदस्या प्रीती भाऊसाहेब बुधवंत यांनी मांडले.

याविषयी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या रावगाव व परिसरात पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत आहे रावगाव मध्ये सध्या टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे परंतु या टँकरच्या खेपा वाढवण्याची गरज आहे तसेच वाडीवस्त्यावर टॅंकरने पाणीपुरवठा होत नाही मोठमोठ्या वस्त्यावर शासनाने पिण्याच्या पाण्यासाठी फायबर टाक्या देऊन या टाक्यात टँकरने पाणी सोडल्यास येथील पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो यामध्ये राऊत- भुजबळ -पाटील वस्ती, केकान- बुधवंत वस्ती, धनगर वस्ती, सोलंकर वस्ती, बाबर वस्ती, या वस्त्यावर प्रामुख्याने पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे.

रावगाव व परिसरात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे साहजिकच पशुधन ही मोठ्या प्रमाणात आहे सध्या शेतकऱ्यांपुढे चाऱ्याअभावी पशुधन वाचवण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे पशुधन कवडीमोल किमतीने बाजारात विकण्याशिवाय शेतकऱ्याकडे पर्याय राहिलेला नाही चाऱ्याअभावी जनावर दारात मरण्यापेक्षा कमी किमतीत विकलेले बरे असे शेतकऱ्यांचा विचार झालेला आहे पशुधन संवर्धनासाठी शासनाने रावगाव व परिसरात ताबडतोब चारा छावण्या चालू करण्याची गरज आहे दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे बागायतदार शेतीतील कामे काढण्यास धजवत नाहीत त्यामुळे कष्टकऱ्या मजुरांच्या हाताला काम भेटत नाही शासनाने रोजगार हमी योजनेतून कष्टकऱ्यांसाठी, मुजरांसाठी शेतीतील कामे ताली टाकणे, पाणी चर खोदणे, बांध-बंधिस्ती तयार करणे ,छोटे छोटे नाले खोदणे, शेततळी खोदणेअसे कामे रोजगार हमीतून चालू करण्यास प्रधान्य द्यावे त्यामुळे कष्टकऱ्यांच्या, मजुरांच्या हाताला काम तर मिळेलच शिवाय शेतीतील कामे शासनाच्या वतिने झाली तर उत्पन्न वाढीसाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल, तसेच मांगी तलावात कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडल्यास जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मिटण्यास मदत होईल तेव्हा कुकडी कॅनाॅलद्वारे मांगी तलावात पाणी सोडण्याचे नियोजन वरिष्ठ पातळीवरून व्हावे असेही रावगाव ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रिति बुधवंत यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!