कृष्णाजीनगर भागात गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना त्रास - तातडीने दुरुस्तीची मागणी -

कृष्णाजीनगर भागात गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना त्रास – तातडीने दुरुस्तीची मागणी

0

करमाळा(दि.३०) -करमाळा शहरातील कृष्णाजीनगर येथे प्रवेश करते वेळी (येडा आई मंदिरासमोर) काही दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बांधकाम केले होते, त्या रस्त्याच्या खालील गटारीच्या पाईपामधून एस. टी. कॉलनी पासून चे घाण पाणी वाहते त्याठिकाणी दोन वेळा नवीन पाईप टाकून बांधकाम केले होते, तरी त्यातून सध्या घाण पाणी बाहेर येत आहे, तसेच कृष्णाजीनगर येथील संजोग सेल्स & सर्व्हिसेसच्या समोर रस्त्यावर असलेल्या गटारीचे काम केलेले होते ती पाइपलाईन देखील कमकुवत पध्दतीने केल्याने त्यातूनही घाण पाणी रोज बाहेर पडून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, तरी नगरपालिकेने तातडीने याकडे लक्ष घालून त्वरित ही दोन्ही कामे करावीत अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

सध्या कृष्णाजीनगर भागातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांना याच रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे, आणि याच रस्त्यावर गटारीचे घाण पाणी वर येत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. होत होता. या परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेत अर्ज केल्यानंतर तेथे रस्त्याच्या खाली गटारीचे नवीन पाईप टाकून रस्ता नीट करण्यात आला होता. पण ते काम अगदी कमकुवत पद्धतीने केल्याने ३ ते ४ दिवसात पुन्हा रस्त्यात खड्डे पडले आहे. त्यामुळे नगरपालिकेने तातडीने याकडे लक्ष घालून त्वरित ही दोन्ही कामे करावीत असे आवाहन येथील नागरिकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!