अर्जुननगर फाटा ते अर्जुननगर गावाला जोडणाऱ्या पुलाची उंची वाढवावी – ग्रामस्थांची मागणी..
![](https://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2022/10/IMG-20221012-WA0017-1024x461.jpg)
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू असून सर्वत्र पाणीच पाणी वहात आहे. तालुक्यातील अर्जुननगर फाटा ते अर्जुननगर गावाला जोडणारा हा पुलही पावसामुळे पाण्याखाली गेला त्यामुळे सदर पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी अर्जुननगर ग्रामस्थांनी केली आहे.
करमाळा तालुक्यात ११ ऑक्टोबरला जो मसुळधार पाऊस झाला.त्या पावसामुळे हा पुल पाण्याखाली गेला होता.पुल पाण्याखाली गेल्यामुळे गावाचा संपर्क तुटला होता. अशात जर एखादी अनुचीत घटना उदभवलि तर नुकसान होऊ शकते, त्यामुळे याच कारणामुळे गावातील ग्रामस्थांनी पुलाची उंची वाढवावी अशी मागणी केली आहे.
याच संदर्भात अर्जुननगर मंडलचे मंडल अधिकारी काझी भाऊसाहेब, ग्रामपंचायत म्हसेवाडी-अर्जुननगरचे सरपंच, पोलिस पाटील,व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुलाची पाहणी करण्यात आली.
![](http://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2022/10/IMG-20221010-WA0024-1024x1024.jpg)
![](http://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2022/09/12-Sept-22-New-Sonaraj-Bhingare-6-1024x1024.jpg)