शेतकऱ्यांना न्याय मिळवूनच देवू – सुनिल सावंत ; करमाळ्यात विविध मागण्या व महागाईबाबत रास्ता रोको..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सध्या महाराष्ट्र सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, कांदयाला दोन रुपये किलों दर असून, महागाई प्रंचड प्रमाणात वाढलेली आहे, महाराष्ट्र सरकार ने नाफेड ची घोषणा अधिवेशनात केली, परंतु अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी नाही, शेतकरी ना न्याय मिळवुन देण्यासाठी वेळ प्रसंगी आम्ही लाठ्या खाऊं परंतु, शेतकऱ्यांना न्याय मिळवुनच देवू असे मत सावध गटाचे नेते सुनील सावंत यांनी व्यक्त केले.
करमाळा येथील जामखेड रोडबायपास चौकात सावंत गटाच्यावतीने सुनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने सकाळी ११ वाजता रस्ता रोखो आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी पुढे बोलताना श्री.सावंत म्हणाले कि, अतिवृष्टी मध्ये झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित भरपाई तातडीने देण्यात यावी, तसेच डिझेल पेट्रोल चे दर कमी करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दाम मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अशा एक ना अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात परंतु सध्याचे सरकार शेतकऱ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी शिवसेनेचे नेते संजय शिंदे राष्ट्रवादी कांग्रेस चे अध्यक्ष हनुमंत मांढरे,भा,रि,प चे देवा लोंढे भिमदल चे सुनील भोसले करमाळा विविध कार्यकारी सोसायटी चे अध्यक्ष मनोज गोडसे, माजी सरपंच विठ्ठल शिंदे, बालाजी अंधारे,आप्पा झिंजाडे बबन जाधव, गणेश अंधारे पानाचंद झिंजाडे बाबुराव आढाव,मल्हारी भांडवलकर पप्पू शिंदे,बंडु झिंजाडे लखन झिंजाडे सुनील काळे, दिनेश पुणेकर शाहीर घोडके,शाम महाडीक , दादासाहेब इंदलकर नितिन बागल संतोष बनकर अनिल इरकर विठ्ठल इवरे , दस्तगीर पठान चंद्रकांत मुसळे मार्तण्ड सुरवसे रमेश हवालदार एच आर पाटिल आनंद रोड़े मयुर घोलप योगेश काकडे संजय नाळे साजीद बेग मंहमद बागवान आलीम पठान महेश भागवत वाजीद शेख राजु नालबंद नागेश उबाळे शहाजी धेंडे अकबर बेग शिवाजी बनकर राहुल तपसे दिलीप चव्हाण खलील मुलाणी गोविंद किरवे रामा कंरडे नितिन माने सचिन सामसे शिवाजी नरूटे दिपक सुपेकर फारुक जमादार जावेद शेख आसीम बेग अरबाज बेग समीर दाऊद शेख आदी शेतकरी उपस्थित होते.
यावेळी कृषि अधिकारी संजय वाकडे नायब तहसीलदार गायकवाड़ कृषि अधिकारी वाकडे पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, मंडलाधिकारी राऊत,तलाठी जवणे पो,काॅ,जाधव,उबाळे,कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, आंदोलन दरम्यान वाहनाची पाच किलोमीटर रांग लागली होती, यावेळी बहुसंख्य शेतकरी आंदोलक उपस्थित होते.