करमाळा शहरातील शाहूनगर भागातील विविध समस्या – नागरिकांची बैठक – मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देणार..
![](https://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2022/12/IMG-20221218-WA0003-300x152.jpg)
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील शाहूनगर भागात नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे, या भागातील रस्ता, गटारी तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे पाण्याचे नियोजन या सर्व बाबीपासून सध्या येथील नागरिक हैराण झाले आहेत, याबाबत येथील नागरिकांनी नुकतीच एक बैठक घेतली असून या बैठकीत येथील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे आवाहन निवेदनाद्वारे करणार असल्याचे सांगितले आहे.
या विचारविनिमय बैठकीस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालिकेला देण्यात येणाऱ्या निवेदनात त्यांनी म्हटले कि, शाहूनगर भागात सध्या विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत, यामध्ये नियमित गटार स्वच्छ करणे, नेहमीच कमी दाबाने व अत्यंत कमी वेळ येणारे पाणी, बाग-बगीचा स्वच्छ करणे, बागेतील लहान मुलांसाठीच्या नवीन खेळण्यांची झालेली दुरवस्था यासारख्या महत्वाच्या समस्या असून त्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी या निवेदनाव्दारे केली आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक यांना निवेदन देण्याचे व तातडीने कार्यवाही होण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचे या बैठकीत ठरले आहे. या बैठीसाठी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.
![](http://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2022/12/01-880x1024.jpg)
![](https://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2022/12/Screenshot_20221205-213712_WhatsApp-1-688x1024.jpg)